Posts

Showing posts from November, 2021

आमदार साहेब....राष्ट्रवादीच्या भूलथापांना बळी पडू नका...!शेखरभाऊंना मदत नाही करता आली तर तटस्थाची भूमिका स्विकारावी...!- राजेंद्र जाधव ;

Image
बिजवडी - जि.बँकेच्या निवडणूकीतून आमदार जयकुमार गोरे साहेबांनी अनपेक्षितपणे माघार घेत आपली भूमिका अजूनही अस्पष्ट ठेवली आहे. मात्र चालू घडामोडीवरून असे दिसून येते की आमदार साहेब राष्ट्रवादीला मदत करण्याच्या विचारात दिसून येतायत.मात्र आमदार साहेब... राष्ट्रवादीसाठी एवढ काही करून आमच्या नेत्यांनी शेखरभाऊंनी केलेल्या मदतीची परतफेड करण्याऐवजी त्यांच्या विरोधात स्व.तात्यांच्याच मुलाला उभ केलेय. राष्ट्रवादी किती फसवी अन वेळ मारून नेणारी आहे ते तुम्हालाही चांगलच माहित आहे.त्यामुळे आमदार साहेब ....राष्ट्रवादी अन त्यांच्या नेत्यांच्या भूलथापांना बळी पडू नका.एकवेळ आमच्या नेत्याला मदत केली तर छानच पण नाही केली तरी चालेल पण या निवडणूकीत आपण तटस्थ राहत राष्ट्रवादीलाही मदत करू नये असे भावनिक आवाहन व विनंती शिवसेनेचे नेते , शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी प्रसिद्धि पत्रकाद्वारे केली आहे.   राजेंद्र जाधव म्हणाले ,स्व.पोळतात्यांना जि.बँकेत निवडून आणण्यासाठी तुमच्याविरोधात आमच्या नेत्यांनी तनमनधनाने किती प्रयत्न केले ते तुम्हालाही माहित आहे.प्रसंगी तुम्हा दोघांवरही अन...

दहिवडी विद्यालयात ५० वर्षांनी एकत्र आले माजी विद्यार्थी...!१९७०-७१ च्या ११ वीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

Image
बिजवडी - रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय दहिवडी ता.माण येथील सन १९७०-७१ या शैक्षणिक वर्षातील अकरावीच्या माजी विद्यार्थ्यांनी ५० वर्षानंतर एकत्र येत सेन्हमेळावा साजरा केला.  शहरामध्ये अशा प्रकारच्या माजी विद्यार्थ्यांची स्नेह संमेलने नियमित होत असतात.परंतु ग्रामीण शाळांमध्ये अशी संमेलने कमी होत असतात.यापूर्वी डॉ. भाऊसाहेब कणसे यांनी पुढाकार घेत या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी २०१४ साली ४८ वर्षांनी एकत्र येत स्नेहमेळावा घेतला होता.त्यापासून प्रेरणा घेऊन १९७०-७१ च्या अकरावीचा माजी विद्यार्थ्यांनी ५० वर्षांनी हा स्नेहमेळावा घेतला.  या मेळाव्याची तयारी करण्यासाठी लॉकडाऊन काळात ऑक्टोबर २०२० मध्ये माजी विद्यार्थी भास्करराव गुंडगे ( काका), भीमराव फडतरे , रमेश जाधव , विठ्ठल जाधव , अशोक टिकोळे , उत्तरेश्वर तोडकर , सिताराम अर्जुन , शालिनी कमले (उज्वला डमकले) यांनी विशेष परिश्रम घेतले.  रविवार ७ नोव्हेंबर २०२१ रोजी दहिवडी येथे मेळावा संपन्न झाला.महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य बी.एस. खाडे या यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे प्रतिमेस हार घालून उदघाटन केले.म...

ग्रामसेवकाला अपशब्द वापरल्याबद्दल आमदारांचा ग्रामसेवक संघटनेतर्फे निषेध..!सातारा जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्या वतीने निवेदन

Image
बिजवडी - आमदार संजय शिरसाठ,औरंगाबाद पश्चिम यांनी ग्रामसेवकांबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल या घटनेचा जाहीर निषेध करत संबधितावर फौजदारी गुन्हा नोंद करण्याची मागणी सातारा जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्या वतीने मा. जिल्हाधिकारी ,मा. मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद सातारा माननीय पोलीस प्रमुख सातारा यांना  निवेदने देऊन करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की ,आमदार संजय शिरसाठ ( औरंगाबाद पश्चिम) यांनी आपला तोल सोडून भाषण केले. ग्रामसेवकांबद्दल अर्वाच्य भाषा वापरून, शिवीगाळी केली.ग्रामसेवक भामटे आहेत. महिला सरपंचांची फसवणूक करतात.हरामखोर शब्द वापरलेला आहे या वक्तव्यामुळे राज्यातील २२ हजार ग्रामसेवकांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत. लोकप्रतिनिधी असे वक्तव्य कसे करू शकतात. यांना भानावर आणणे गरजेचे आहे.राज्यभर ग्रामसेवक अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत प्रामाणिकपणे कामकाज करीत आहेत.संजय शिरसाठ यांनी जाहीर माफी मागावी.आपले म्हणणे मागे घ्यावे.समाजात ग्रामसेवकांबद्दल चुकीचा समज गेला आहे. कृपया ग्रामसेवक संवर्ग खुप तणावाखाली आलेला आहे.प्रचंड मानहानी झालेली आहे.सरपंच आणि ग्रामसेवकांमध्ये तेढ निर्माण झा...