लॉकडाऊन उठताच महावितरणची सक्तीची वीजबील वसूली..!- नारायण अहिवळे
बिजवडी - कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी गेले दिड वर्षेपासून वारंवार लॉकडाऊन टाकले जात आहे.त्यामुळे सर्वांचेच जनजीवन विस्कळीत झाले आहे. उद्योग , व्यवसाय ,रोजगार बंद असल्याने आर्थिक समस्येने नागरीकांना त्रासले आहे.त्यातच लॉकडाऊन उठताच महावितरणने सक्तीची वीजबील वसूली मोहिम राबवल्याने नागरीक हतबल होत आहेत. सर्वसामन्य ,गोरगरीब , व्यावसायिकांनी वीजबील भरायचे कसे हा प्रश्न पडला आहे.महावितरण ने वीजबील वसूली साठी नागरीकांना थोडी सवलत देता आली नाही तरी किमान वीजबीलात दोनतीन टप्पे करून देण्याची मागणी स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण अहिवळे यांनी केली आहे. माण तालुक्यासह दहिवडी विभागात वीजबील वसूली मोहीम सुरू आहे. लॉकडाऊन उठवल्याने आता कुठे सर्वकाही सुरू झाले असले तरी व रोजगारांना लगेच रोजगार उपलब्ध होणार नाही. व्यवसाय ,व्यापार , दुकानदारी म्हणावी तशी अजून सुरू झाली नाही.त्यामुळे आर्थिक उलाढाल ठप्प आहे .ते कसेबसे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.यात त्यातच महावितरण कडून सक्तीचे वीज बिल वसुली सुरू आहे. कोणताही विचार न करता, पूर्व कल्पना न...